land slide माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. घाटामध्ये अचानक झालेल्या भूस्खलनामुळे मोठी हानी झालीय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाच धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस आणि बर्फवृ्ष्टी सुरु आहे.त्यामुळे सातत्याने तिथे डोंगरावरुन दरड कोसळत आहेत.त्यातच सध्या कुल्लू जिल्ह्याकील एका भागतही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे,जिथे एक कार चालक थोडक्यात बचावला.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
हिमाचलमध्ये वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहेत. कुठे हिमवर्षावामुळे हवामान आल्हाददायक बनले आहे. तर कुठे याच हिमवर्षावामुळे लोकांच्या डोक्यावर संकड घोंघावत आहे. कुल्लू मनालीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे सरवारी नाल्याने रौद्ररुप धारण केले आहे. ज्यामुळे काही वेळातच काही वाहन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. तर कुल्लूमधील गांधी नगरमध्ये मध्ये देखील काही वाहने ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. कुल्लूमध्ये दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. भूकंप, त्सुनामी, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक घटना अचानक घडतात. या नैसर्गिक घटनांमुळे किती लोकांना जीव गमवावा लागतो हे तुम्ही पाहिलेच असेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुल्लूमध्ये एका घाटात अनेक वाहने ये-जा करत आहेत. यावेळी अचानक एक भयानक भूस्खलन होते आणि यामध्ये एक कार पुढे जाणार तेवढ्यात कारच्या पुढ्यातच मोठा दगड कोसळतो फक्त एका सेंकदाच्या फरकानं ही दुर्घटना टळते आहे. सुदैवानं या कारवर दगड पडला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामधून एका सेंकदाचंही किती महत्त्व आहे हे कळून येत आहे.